..... वळणावरची चांगी .....
" अरे काय झालं अचानक? दोन दिवसात चार अॅक्सीडंट आणि सर्वच्या सर्व मृत्युमुखी? तेही एकाच जागेवर? "
इन्सपेक्टर थोरात टेबलावरची टोपी उचलत बोलले..
" चला हवालदार साळूंखे जीप काढा. आता पुन्हा तेच काम.. " जीपकडे जात थोरातांनी ऑर्डर सोडली.
हवालदार साळूंखेंनी एक वेळ साहेबांकडे पाहीलं आणि गाडी कडे गेले.
गेल्या दोन दिवसातली ही चौथी खेप होती त्यांची.
गाडी सुरु झाल्यावर साळूंखे बोलते झाले..
" साहेब.. मी काल माहीती काढली थोडीफार. त्या वळणावर रस्ताचे काम चालू असताना एका मजूर बाईला डंपरने उडवले होते. ती थेट खाली दरीत जाऊन पडली होती. बाजूच्या गावातली लोकं म्हणताहेत तिचेच भूत झालंय. आणि रात्री एक नंतर येणाऱ्या गाड्यांना दरीत ढकलतंय "
" साळूंखे?? या असल्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे? अहो.. समजा जर ते भुत असेल तर ते ढकलेल कसं? � जरा तरी विचार करा की. काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम दिसतोय मला. एकाच जागी लागोपाठ अपघात होताहेत म्हणजे काहीतरी टेक्नीकल दिसतंय मला." थोरात साळूंखेंच्या चेहऱ्याकडे बघत हसत म्हणाले.
" नाही साहेब, आज संध्याकाळी गावातल्या लोकांनी मांत्रिक आणला होता. त्यानेही तेच सांगितलंय. " साळूंखे गिअर टाकत म्हणाले.
" साळूंखे.. सोडा हे अंधश्रद्धेचे चाळे. इथे माणूस मंगळावर निघालाय आणि तुमची झाडावरची भूतं सुटेनात. नाव काय त्या मांत्रिकाचे? " चिडून थोरातांनी साळूंखेंना प्रश्न केला.
" अद्भूतनाथ.. साहेब.. अद्भूतनाथ .. लयी जालीम आहे साहेब. "साळूंखेंच्या डोळ्यात त्याची भिती स्पष्ट दिसत होती.
" एकदा हे वळणावरचे अॅक्सीडेंट चे प्रकरण सॉल्व होऊ दे.. मग तुमच्या त्या अद्भूतनाथाचे भूत उतरवतो.
गाडीचा वेग अचानक मंदावला...
" या वळणावर नाही साळूंखे.. पुढच्या वळणावर, विसरलात की काय अद्भूतनाथाच्या भितीने? " इन्सपेक्टर थोरात साळूंखेंना चिडवत म्हणाले.
" साहेब अजून उजाडले नाही गाडीचा वेग कमीच असलेला बरा. " हवालदार साळूंखे रस्त्यावरची नजर अजिबात न हटवता बोलत होते.
" बरं.. बरं.. मी दरवाजा उघडा ठेवू का? म्हणजे त्या भुताने धक्का मारला की लगेच बाहेर पडायला बरं "
थोरात मिश्कील हसत होते.
गाडी वळणावर आली. तिथे गावातली १५-२० लोकं होती आणि चौकीतले दोन हवालदार होते.
साहेबांना पाहून दोघांनी सलाम ठोकला आणि परिस्थिति समजवून सांगायला सुरुवात केली.
" अगदी कालच्यासारखाच अपघात आहे साहेब. गाडी MH -01 स्विफ्ट आहे. गाडीवरचा ताबा सुटला आणि सरळ जावून गाडी दरीत पडलीय. गाडीत तीन माणसं होती. एक पुरुष साधारण ४०-४२ वर्ष एक स्त्री साधारण ३५-३७ वर्ष आणि एक मुलगा १२ वर्षाचा. ऑन द स्पॉट डेथ झाली साहेब. "हवालदार कदमांनी माहीती दिली.
" बरं.. अॅम्ब्युलन्स मागवा. डेडबॉडी काढायला कालच्या त्या दोघांना बोलवा. पंचनामा करुन घ्या. नावं कळाली की संबंधित पोलिसस्टेशनला कळवा. MH 01 आहे म्हणजे मुंबई वालेच कुटूंब दिसतंय. जरा बॅटरी द्या इकडे.. " म्हणत त्यांनी कदमांसमोर हात केला.
" साळूंखे.. इकडे या जरा. काय वाकून बघताय तिकडे? धक्का मारेल कोणीतरी " मिश्किल हसत थोरातांनी साळूंखेंना हाक मारली.
ओशाळलेल्या चेहऱ्याने साळूंखे धावत थोरात साहेब उभे होते तिथे गेले.
बॅटरीने एक जागा दाखवत म्हणाले
" हे पहा... टायरची खुण पहा.. गाडी सरळ गेली अजिबात लेफ्ट राईट न करता. काही प्रयत्न दिसत नाही स्टेअरींग फिरवल्याचा. कोणी धक्का मारला असता तर फरफटल्याच्या खुणा दिसल्या असत्या. हे वळण जरा शार्प आहे. मी सा बां विभागाला तेव्हाही कळवलं होतं की लवकरच कठडा बांधा म्हणून, दिस इज ओन्ली बिकॉज ऑफ दिज सा बां पिपल.. " हवालदार साळूंखेंनी मान हलवली.
" साहेब.. साहेब... या इकडे एक डेडबॉडी वर घेतली. " कदमांचा आवाज ऐकून थोरात तिकडे निघाले.
कदमांनी दोरीला बांधलेली ती डेडबॉडी सोडवली होती.
" साहेब श्रीधर काळे नाव आहे याचे. मुंबईचाच आहे... " कदम सांगत असताना हवालदार साळूंखेंचे लक्ष त्याच्या डोळ्याकडे गेले.
कालच्या अपघातातील विष्णु गुरवांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर हेच भाव होते. आत्यंतिक भितीने ते डोळे थिजले होते.
साळूंखेंच्या मनात विचार आला की साहेबांना ही गोष्ट सांगावी परंतू पुन्हा साहेब हसतील म्हणून ते शांत राहीलेदोन गावकरी बोलत होते त्यांच्याकडे थोरातांनी कान वळवले
" बघितलाव? अद्भुत्या बोलला तसाच होताय ना? ही बया आता येक येकट्या गाड्यांना धक्कं मारुन खाली पाडनार आनी जीव घेनार. चांगी पक्का बदला घेनार असा दिसताय. या वाकना पासून लांबच रायला हवा नायतर कायतरी बंदोबस करायला हवा. " पहिला गावकरी जस जसे बोलत होता तस तसे दुसरा थरथरत होता.
" ही लोकं काही केल्या सुधारणार नाहीत. साध्या अपघातात कसले भुतं खेतं आणताहेत? " इन्सपेक्टर थोरात मनातल्या मनात बोलत होते.
तिकडे राहीलेल्या दोन्ही बॉडीज वर आणल्या होत्या. ती दोघं झोपेतच गेले असावेत. मुलाचा देह पार चेचला गेला होता.
थोडंफार उजाडायला लागलेलं एव्हाना...
डेडबॉडीज हॉस्पिटलला पोस्टमार्टमसाठी पाठवल्या गेल्या होत्या. क्रेन लावून गाडी काढण्यात आली होती. जागा साफसुफ करण्यात आली...
इन्सपेक्टर थोरांताची ड्युटी संपली होती.
खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
" नेमकं काय होत असेल? एकाच जागी एकाच प्रकारे अपघात होणे ही साधी बाब नक्कीच नाही....
की मग खरोखरच भुताटकी वगैरे आहे...
छे.. छे.. मी सुद्धा विचित्र विचार करायला लागलो...
अधिकाऱ्याला सांगून आज रेतीने भरलेले पिंप तर ठेवून घेतले पण त्याने गाडी थांबेल पण अपघात टळणार नाही. किमान मृत्यू तरी नाही होणार. या गावकऱ्यांना एकदा जाऊन भेटले पाहीजे. त्यांच्या मनातली ती अद्भुतनाथाची भिती आणि भुताची अंधश्रद्धा संपवली पाहीजे. त्यासाठी आधी या अद्भूतनाथाची कुंडली काढली पाहीजे.. " विचार करत करत त्यांना झोप लागली.
दुपारी अधिकाऱ्यांना फोन करुन पिंपांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे इन्सपेक्टर थोरात थोडे आनंदात होते
संध्याकाळी ड्युटीवर आल्यावर मनातल्या मनात एकच विचार सुरु होता की आज तरी नवीन अपघात नको होऊ दे.
नेहमीची कामे सुरु असताना रात्री साडे अकरा वाजता फोन खणाणला...
" हॅलो... पोलिस स्टेशन.. अपघात झालाय.. " हवालदार साळूंखेंची झोप उडाली. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून थोरात काय ते समजून गेले.
वळणावर पोहचल्यावर लक्षात आलं की.. तो ट्रक होता पिंपांसकट खाली गेला होता. ड्रायव्हर मेला होता. क्लिनर जिवंत होता, पण खुप जखमी झाला होता.
हॉस्पिटलमध्ये शुद्ध आली तेव्हा कळले की तो झोपलेला होता. म्हणजे आता ही निराशाच हाती लागली होती.
मग शेवटी इन्सपेक्टर थोरातांनी ठरवले की अद्भूतनाथाची भेट घ्यायला हवी.
बघूया काय माहीती मिळते चांगीबद्दल.
साळूंखेंच्या मदतीने त्याची भेट स्वतःच्या घरी ठरवली.
सकाळी ११ वाजता भगव्या कफनीत अद्भूतनाथ आला.
" अल्लख निरंजन... बोला साहेब आमची आठवण का काढली? " हातातला चिमटा वाजवत अद्भूतनाथाने प्रश्न केला.
" नाटकं बंद कर आणि मला हे सांग...
चांगीबद्दल तुला काय माहीत आहे? आणि जे आहे ते सांग.. उगाच स्टोऱ्या बनवून सांगू नको." त्यांच्या आवाजातली जरब पाहूनच अद्भूतनाथ थंड पडला.
" साहेब... चांगी ही तिथे रस्त्याचे काम करणाऱ्या लोकांपैकी होती. एका संध्याकाळी एका गाडीने तिला त्या वळणावर उडवले. तिचे चिंधड्या झालेले शरीर दुसऱ्या दिवशी दरीत मिळाले होते तेव्हापासून दर अमावस्येला ती त्या वळणावर दिसते. लोक म्हणतात की तिचं भूत झालंय. " एवढं बोलून त्याने दम घेतला.
" हे मलाही माहीत आहे.. आतली गोष्ट सांग... खरंच असं आहे का? मी भुत वगैरे मानत नाही म्हणून मला दिसत नाहीत भुतं. तू मानतोस ना? मग सांग लवकर काय भानगड आहे? " थोरातांचा आवाज वाढला होता.
" साहेब.. माझं ऐकाल तर यात तुम्ही पडू नका. गावकरी तिचा बंदोबस्त करायला तयार झालेत. एक रात्रीची पुजा आणि यज्ञ केला की तिला मुक्ती देईन मी.. मग ती त्रास देणार नाही कोणाला. मात्र तुम्ही आत घुसलात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो... म्हणजे माझ्याकडून नाही.. चांगीकडून... "
तो उठला...
अचानक मागे फिरुन म्हणाला..
" साहेब आज काही झाले तरी तुम्ही वळणावर जाऊ नका.. तुम्हाला धोका आहे. मला जे काही कळतं त्यावरुन सांगतोय.. तुम्ही आज तिकडे जाऊच नका.. गावकऱ्यांनी आज तिला मुक्त करण्याची सुपारी दिलीय मला.. अल्लख निरंजन.. " म्हणून तो निघून गेला.
संध्याकाळी अंधार पडल्यावर इन्सपेक्टर थोरात चौकीतच फेऱ्या मारत होते. अचानक थांबले आणि साळूंखेंजवळ गेले.
" साळूंखे... चला आज मी तुमचा ड्रायव्हर होतो. एक महत्वाचे काम आहे ते करुन येऊया.. बघा ही वळणावरच्या अपघाताची केस आज स्वॉल्व होते की नाही. " ते म्हणाले आणि इकडे साळूंखेंना घाम फुटला.
" साहेब नको.. ना.. का विषाची परिक्षा घेताय? तुम्हाला काय सांगितलंय अद्भूतनाथाने विसरलात? " साळूंखेंनी हात जोडले होते.
" अरेव्वा.. तुम्हाला सांगितले तर अद्भूतनाथाने? तर मग चलाच.. बघा कसा शब्द खोटा ठरतो तुमच्या अद्भूतनाथाचा आणि चांगी वांगी कोणी नाही हे सिद्ध करुन दाखवतो मी.. " चाव्या ताब्यात घेत थोरातांनी ऑर्डर सोडली.
जीप बाहेर निघाली तशी साळूंखे बोलले..
" साहेब इकडून कुठे? खुप मोठा फेरा पडेल. सरळ चला की "
" साळूंखे.. आपलं हेच चुकत होतं.. आता कळेल नेमकं काय होतंय ते. आपण त्या रस्त्यावरुन प्रवास केल्याशिवाय कसे समजेल की अपघात का होताहेत? आपण नेहमी उलट बाजूने येत होतो. दरीत पडणारी गाडी समोरच्या बाजूने येत होती. आपण तपासणी फक्त त्या अपघाताच्या जागेची करायचो. त्या आधी काय होत असेल याचा कधी विचार केलाच नाही. चला लक्ष ठेवा.. आणि तो सिट बेल्ट लावा पहिला.."
पंधरा मिनीटांनी वळसा घालून ते त्या वळणाजवळ पोहचले. थोरांतानी अप्पर लाईट केली आणि श्वास रोखून गाडी चालवू लागले.
वळण अर्धे झाले... आणि अचानक...
दोन हात वर करुन संपुर्ण पांढरा रंग असलेली एक आकृती चमकली. एक क्षण.. थोरातही घाबरले.
थोरातांनी करकचून ब्रेक दाबले. गाडी जागच्या जागी थांबली...
" बघा साळूंखे... ही तुमची चांगी. लोक या गोष्टीला घाबरत होते आणि गाडीवरचा कंट्रोल सोडून दरीत जाऊन पडत होते. आपण आता कॉन्शस होतो म्हणून गाडी थांबवली, बाकीच्यांना संधीच मिळाली नसणार. अचानक अंधारात हे असलं काही दिसलं की कोणीही घाबरणारच. त्यात हा रस्ता निर्मनुष्य मग मनात खेळ सुरु होतात.
येतंय का लक्षात? अहो हा साबां विभागाने लावलेला सिमेंटचा बोर्ड आहे साधा पण कारागिरी केल्यामुळे माणसाचा आकार असल्याचा भासतोय. त्यात वर रिफ्लेक्ट होणारा पांढरा रंग मारलाय वेड्या कॉन्ट्रॅक्टरने. उगाच सात जीव गेले... साळूंखे... काही बोलत का नाहीत? "
साळूंखे बोलण्याच्या पलिकडे गेले होते. चांगीचे भूत जाता जाता... साळूंखे हवालदारांना घेऊन गेलं होतं..
" अरे काय झालं अचानक? दोन दिवसात चार अॅक्सीडंट आणि सर्वच्या सर्व मृत्युमुखी? तेही एकाच जागेवर? "
इन्सपेक्टर थोरात टेबलावरची टोपी उचलत बोलले..
" चला हवालदार साळूंखे जीप काढा. आता पुन्हा तेच काम.. " जीपकडे जात थोरातांनी ऑर्डर सोडली.
हवालदार साळूंखेंनी एक वेळ साहेबांकडे पाहीलं आणि गाडी कडे गेले.
गेल्या दोन दिवसातली ही चौथी खेप होती त्यांची.
गाडी सुरु झाल्यावर साळूंखे बोलते झाले..
" साहेब.. मी काल माहीती काढली थोडीफार. त्या वळणावर रस्ताचे काम चालू असताना एका मजूर बाईला डंपरने उडवले होते. ती थेट खाली दरीत जाऊन पडली होती. बाजूच्या गावातली लोकं म्हणताहेत तिचेच भूत झालंय. आणि रात्री एक नंतर येणाऱ्या गाड्यांना दरीत ढकलतंय "
" साळूंखे?? या असल्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे? अहो.. समजा जर ते भुत असेल तर ते ढकलेल कसं? � जरा तरी विचार करा की. काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम दिसतोय मला. एकाच जागी लागोपाठ अपघात होताहेत म्हणजे काहीतरी टेक्नीकल दिसतंय मला." थोरात साळूंखेंच्या चेहऱ्याकडे बघत हसत म्हणाले.
" नाही साहेब, आज संध्याकाळी गावातल्या लोकांनी मांत्रिक आणला होता. त्यानेही तेच सांगितलंय. " साळूंखे गिअर टाकत म्हणाले.
" साळूंखे.. सोडा हे अंधश्रद्धेचे चाळे. इथे माणूस मंगळावर निघालाय आणि तुमची झाडावरची भूतं सुटेनात. नाव काय त्या मांत्रिकाचे? " चिडून थोरातांनी साळूंखेंना प्रश्न केला.
" अद्भूतनाथ.. साहेब.. अद्भूतनाथ .. लयी जालीम आहे साहेब. "साळूंखेंच्या डोळ्यात त्याची भिती स्पष्ट दिसत होती.
" एकदा हे वळणावरचे अॅक्सीडेंट चे प्रकरण सॉल्व होऊ दे.. मग तुमच्या त्या अद्भूतनाथाचे भूत उतरवतो.
गाडीचा वेग अचानक मंदावला...
" या वळणावर नाही साळूंखे.. पुढच्या वळणावर, विसरलात की काय अद्भूतनाथाच्या भितीने? " इन्सपेक्टर थोरात साळूंखेंना चिडवत म्हणाले.
" साहेब अजून उजाडले नाही गाडीचा वेग कमीच असलेला बरा. " हवालदार साळूंखे रस्त्यावरची नजर अजिबात न हटवता बोलत होते.
" बरं.. बरं.. मी दरवाजा उघडा ठेवू का? म्हणजे त्या भुताने धक्का मारला की लगेच बाहेर पडायला बरं "
थोरात मिश्कील हसत होते.
गाडी वळणावर आली. तिथे गावातली १५-२० लोकं होती आणि चौकीतले दोन हवालदार होते.
साहेबांना पाहून दोघांनी सलाम ठोकला आणि परिस्थिति समजवून सांगायला सुरुवात केली.
" अगदी कालच्यासारखाच अपघात आहे साहेब. गाडी MH -01 स्विफ्ट आहे. गाडीवरचा ताबा सुटला आणि सरळ जावून गाडी दरीत पडलीय. गाडीत तीन माणसं होती. एक पुरुष साधारण ४०-४२ वर्ष एक स्त्री साधारण ३५-३७ वर्ष आणि एक मुलगा १२ वर्षाचा. ऑन द स्पॉट डेथ झाली साहेब. "हवालदार कदमांनी माहीती दिली.
" बरं.. अॅम्ब्युलन्स मागवा. डेडबॉडी काढायला कालच्या त्या दोघांना बोलवा. पंचनामा करुन घ्या. नावं कळाली की संबंधित पोलिसस्टेशनला कळवा. MH 01 आहे म्हणजे मुंबई वालेच कुटूंब दिसतंय. जरा बॅटरी द्या इकडे.. " म्हणत त्यांनी कदमांसमोर हात केला.
" साळूंखे.. इकडे या जरा. काय वाकून बघताय तिकडे? धक्का मारेल कोणीतरी " मिश्किल हसत थोरातांनी साळूंखेंना हाक मारली.
ओशाळलेल्या चेहऱ्याने साळूंखे धावत थोरात साहेब उभे होते तिथे गेले.
बॅटरीने एक जागा दाखवत म्हणाले
" हे पहा... टायरची खुण पहा.. गाडी सरळ गेली अजिबात लेफ्ट राईट न करता. काही प्रयत्न दिसत नाही स्टेअरींग फिरवल्याचा. कोणी धक्का मारला असता तर फरफटल्याच्या खुणा दिसल्या असत्या. हे वळण जरा शार्प आहे. मी सा बां विभागाला तेव्हाही कळवलं होतं की लवकरच कठडा बांधा म्हणून, दिस इज ओन्ली बिकॉज ऑफ दिज सा बां पिपल.. " हवालदार साळूंखेंनी मान हलवली.
" साहेब.. साहेब... या इकडे एक डेडबॉडी वर घेतली. " कदमांचा आवाज ऐकून थोरात तिकडे निघाले.
कदमांनी दोरीला बांधलेली ती डेडबॉडी सोडवली होती.
" साहेब श्रीधर काळे नाव आहे याचे. मुंबईचाच आहे... " कदम सांगत असताना हवालदार साळूंखेंचे लक्ष त्याच्या डोळ्याकडे गेले.
कालच्या अपघातातील विष्णु गुरवांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर हेच भाव होते. आत्यंतिक भितीने ते डोळे थिजले होते.
साळूंखेंच्या मनात विचार आला की साहेबांना ही गोष्ट सांगावी परंतू पुन्हा साहेब हसतील म्हणून ते शांत राहीलेदोन गावकरी बोलत होते त्यांच्याकडे थोरातांनी कान वळवले
" बघितलाव? अद्भुत्या बोलला तसाच होताय ना? ही बया आता येक येकट्या गाड्यांना धक्कं मारुन खाली पाडनार आनी जीव घेनार. चांगी पक्का बदला घेनार असा दिसताय. या वाकना पासून लांबच रायला हवा नायतर कायतरी बंदोबस करायला हवा. " पहिला गावकरी जस जसे बोलत होता तस तसे दुसरा थरथरत होता.
" ही लोकं काही केल्या सुधारणार नाहीत. साध्या अपघातात कसले भुतं खेतं आणताहेत? " इन्सपेक्टर थोरात मनातल्या मनात बोलत होते.
तिकडे राहीलेल्या दोन्ही बॉडीज वर आणल्या होत्या. ती दोघं झोपेतच गेले असावेत. मुलाचा देह पार चेचला गेला होता.
थोडंफार उजाडायला लागलेलं एव्हाना...
डेडबॉडीज हॉस्पिटलला पोस्टमार्टमसाठी पाठवल्या गेल्या होत्या. क्रेन लावून गाडी काढण्यात आली होती. जागा साफसुफ करण्यात आली...
इन्सपेक्टर थोरांताची ड्युटी संपली होती.
खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
" नेमकं काय होत असेल? एकाच जागी एकाच प्रकारे अपघात होणे ही साधी बाब नक्कीच नाही....
की मग खरोखरच भुताटकी वगैरे आहे...
छे.. छे.. मी सुद्धा विचित्र विचार करायला लागलो...
अधिकाऱ्याला सांगून आज रेतीने भरलेले पिंप तर ठेवून घेतले पण त्याने गाडी थांबेल पण अपघात टळणार नाही. किमान मृत्यू तरी नाही होणार. या गावकऱ्यांना एकदा जाऊन भेटले पाहीजे. त्यांच्या मनातली ती अद्भुतनाथाची भिती आणि भुताची अंधश्रद्धा संपवली पाहीजे. त्यासाठी आधी या अद्भूतनाथाची कुंडली काढली पाहीजे.. " विचार करत करत त्यांना झोप लागली.
दुपारी अधिकाऱ्यांना फोन करुन पिंपांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे इन्सपेक्टर थोरात थोडे आनंदात होते
संध्याकाळी ड्युटीवर आल्यावर मनातल्या मनात एकच विचार सुरु होता की आज तरी नवीन अपघात नको होऊ दे.
नेहमीची कामे सुरु असताना रात्री साडे अकरा वाजता फोन खणाणला...
" हॅलो... पोलिस स्टेशन.. अपघात झालाय.. " हवालदार साळूंखेंची झोप उडाली. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून थोरात काय ते समजून गेले.
वळणावर पोहचल्यावर लक्षात आलं की.. तो ट्रक होता पिंपांसकट खाली गेला होता. ड्रायव्हर मेला होता. क्लिनर जिवंत होता, पण खुप जखमी झाला होता.
हॉस्पिटलमध्ये शुद्ध आली तेव्हा कळले की तो झोपलेला होता. म्हणजे आता ही निराशाच हाती लागली होती.
मग शेवटी इन्सपेक्टर थोरातांनी ठरवले की अद्भूतनाथाची भेट घ्यायला हवी.
बघूया काय माहीती मिळते चांगीबद्दल.
साळूंखेंच्या मदतीने त्याची भेट स्वतःच्या घरी ठरवली.
सकाळी ११ वाजता भगव्या कफनीत अद्भूतनाथ आला.
" अल्लख निरंजन... बोला साहेब आमची आठवण का काढली? " हातातला चिमटा वाजवत अद्भूतनाथाने प्रश्न केला.
" नाटकं बंद कर आणि मला हे सांग...
चांगीबद्दल तुला काय माहीत आहे? आणि जे आहे ते सांग.. उगाच स्टोऱ्या बनवून सांगू नको." त्यांच्या आवाजातली जरब पाहूनच अद्भूतनाथ थंड पडला.
" साहेब... चांगी ही तिथे रस्त्याचे काम करणाऱ्या लोकांपैकी होती. एका संध्याकाळी एका गाडीने तिला त्या वळणावर उडवले. तिचे चिंधड्या झालेले शरीर दुसऱ्या दिवशी दरीत मिळाले होते तेव्हापासून दर अमावस्येला ती त्या वळणावर दिसते. लोक म्हणतात की तिचं भूत झालंय. " एवढं बोलून त्याने दम घेतला.
" हे मलाही माहीत आहे.. आतली गोष्ट सांग... खरंच असं आहे का? मी भुत वगैरे मानत नाही म्हणून मला दिसत नाहीत भुतं. तू मानतोस ना? मग सांग लवकर काय भानगड आहे? " थोरातांचा आवाज वाढला होता.
" साहेब.. माझं ऐकाल तर यात तुम्ही पडू नका. गावकरी तिचा बंदोबस्त करायला तयार झालेत. एक रात्रीची पुजा आणि यज्ञ केला की तिला मुक्ती देईन मी.. मग ती त्रास देणार नाही कोणाला. मात्र तुम्ही आत घुसलात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो... म्हणजे माझ्याकडून नाही.. चांगीकडून... "
तो उठला...
अचानक मागे फिरुन म्हणाला..
" साहेब आज काही झाले तरी तुम्ही वळणावर जाऊ नका.. तुम्हाला धोका आहे. मला जे काही कळतं त्यावरुन सांगतोय.. तुम्ही आज तिकडे जाऊच नका.. गावकऱ्यांनी आज तिला मुक्त करण्याची सुपारी दिलीय मला.. अल्लख निरंजन.. " म्हणून तो निघून गेला.
संध्याकाळी अंधार पडल्यावर इन्सपेक्टर थोरात चौकीतच फेऱ्या मारत होते. अचानक थांबले आणि साळूंखेंजवळ गेले.
" साळूंखे... चला आज मी तुमचा ड्रायव्हर होतो. एक महत्वाचे काम आहे ते करुन येऊया.. बघा ही वळणावरच्या अपघाताची केस आज स्वॉल्व होते की नाही. " ते म्हणाले आणि इकडे साळूंखेंना घाम फुटला.
" साहेब नको.. ना.. का विषाची परिक्षा घेताय? तुम्हाला काय सांगितलंय अद्भूतनाथाने विसरलात? " साळूंखेंनी हात जोडले होते.
" अरेव्वा.. तुम्हाला सांगितले तर अद्भूतनाथाने? तर मग चलाच.. बघा कसा शब्द खोटा ठरतो तुमच्या अद्भूतनाथाचा आणि चांगी वांगी कोणी नाही हे सिद्ध करुन दाखवतो मी.. " चाव्या ताब्यात घेत थोरातांनी ऑर्डर सोडली.
जीप बाहेर निघाली तशी साळूंखे बोलले..
" साहेब इकडून कुठे? खुप मोठा फेरा पडेल. सरळ चला की "
" साळूंखे.. आपलं हेच चुकत होतं.. आता कळेल नेमकं काय होतंय ते. आपण त्या रस्त्यावरुन प्रवास केल्याशिवाय कसे समजेल की अपघात का होताहेत? आपण नेहमी उलट बाजूने येत होतो. दरीत पडणारी गाडी समोरच्या बाजूने येत होती. आपण तपासणी फक्त त्या अपघाताच्या जागेची करायचो. त्या आधी काय होत असेल याचा कधी विचार केलाच नाही. चला लक्ष ठेवा.. आणि तो सिट बेल्ट लावा पहिला.."
पंधरा मिनीटांनी वळसा घालून ते त्या वळणाजवळ पोहचले. थोरांतानी अप्पर लाईट केली आणि श्वास रोखून गाडी चालवू लागले.
वळण अर्धे झाले... आणि अचानक...
दोन हात वर करुन संपुर्ण पांढरा रंग असलेली एक आकृती चमकली. एक क्षण.. थोरातही घाबरले.
थोरातांनी करकचून ब्रेक दाबले. गाडी जागच्या जागी थांबली...
" बघा साळूंखे... ही तुमची चांगी. लोक या गोष्टीला घाबरत होते आणि गाडीवरचा कंट्रोल सोडून दरीत जाऊन पडत होते. आपण आता कॉन्शस होतो म्हणून गाडी थांबवली, बाकीच्यांना संधीच मिळाली नसणार. अचानक अंधारात हे असलं काही दिसलं की कोणीही घाबरणारच. त्यात हा रस्ता निर्मनुष्य मग मनात खेळ सुरु होतात.
येतंय का लक्षात? अहो हा साबां विभागाने लावलेला सिमेंटचा बोर्ड आहे साधा पण कारागिरी केल्यामुळे माणसाचा आकार असल्याचा भासतोय. त्यात वर रिफ्लेक्ट होणारा पांढरा रंग मारलाय वेड्या कॉन्ट्रॅक्टरने. उगाच सात जीव गेले... साळूंखे... काही बोलत का नाहीत? "
साळूंखे बोलण्याच्या पलिकडे गेले होते. चांगीचे भूत जाता जाता... साळूंखे हवालदारांना घेऊन गेलं होतं..