... महादेव मामा....
पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीतले नारायण हे पात्र जरी काल्पनिक असले तरी तसे पात्र आपल्याला अनेक ठिकाणी दिसतेच दिसते. आमच्या घरी ते पात्र " महादेव मामा" म्हणून होते.
महादेव मामांना मी मला समजू लागल्या पासून बघितल्याचे आठवतंय. अवतार सुद्धा अनेक वर्ष तसाच..
काखेला भली मोठी पिशवी, दोन माप मोठा शर्ट, आठवडाभर एकच पँट, मानेभोवती लाल किंवा निळा रुमाल, केसात दात कोरायला अगरबत्तीची काडी, तोंडात संपुर्ण वेळ पान, एका हातात पाण्याची जुनी बाटली, खांद्यावर नॅपकीन, पायात स्लीपर. आम्हाला महादेव मामांना अशीच बघायची सवय होती.
आमचा व्यवसाय कानातले बनवायचा आहे, महादेव मामा त्यातलेच काही नेऊन रस्त्यावर नेऊन विकायचे. नेहमीच नविन नेतील असेही काही नाही तुटले बिटलेले सुद्धा त्यांना चालत. इकडून तिकडून जोडून जोडी बनली की ती विकायला मोकळी.
महादेव मामांचा एक एरिया होता ते तिकडेच जास्त बसत. आमचं दुकान भुलेश्वरला, पण तिथे जास्त गर्दी शिवाय पोलिसांचा सारखा त्रास म्हणून ते थोडावेळ भास्कर लेन, थोडावेळ रामवाडी तर थोडा वेळ पार तिकडे चिराबाजारच्या कोलभाट लेनमध्ये. जिथे जातील तिथे त्यांच्या ओळखी ठरलेल्या. माणूस इतका बडबड्या की दुर्लक्षीत राहूच शकत नाही. त्यांच्या बडबडीचा त्रास झालेली व्यक्ती मला तरी आठवत नाही. सतत कोणतेतरी किस्से आणि गोष्टी सांगून समोरच्या गिऱ्हाईकाला कसं पटवायचं हे मामांनाच जमावं...
यांची गिऱ्हाईक म्हणजे तरी कोण. अगदी जीना झाडणाऱ्या मुली पासून त्याच बिल्डींग मध्ये मोठ्या घरात राहणारी भाभी सुद्धा. ती मुलगी जर दोन रुपये खर्च करणार असेल तर तिला त्या प्रकारची वस्तू दाखवणार आणि भाभीला महागातली. त्यांच्या त्या पिशवीतून काय बाहेर येईल हे कधीच कोणाला कळायचे नाही.
मी एकदा त्यांना दुकान लावताना पाहीलेलं..
सर्वात पहिले खाली पेपर अंथरुन, त्यावर प्लास्टिक चा कागद आणि मग त्यावर एक एक खोके असे रचत की समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला एका नजरेत सर्व माल दिसे. कानातले डूल, झुमक्या, गळ्यातले हार, माळा, केसांचे बक्कल, लुजर अनेक प्रकारचे टिकल्या, सुया, बांगड्या सर्व वस्तू मिळत त्यांच्याकडे. सर्व दुकान लावून झाले की... " बोलण्याची मातीपण विकली जाते... " नुसार... आओ आओ, लॉट है..सेल है..., पाच पाच रुपया असे ओरडणे सुरु व्हायचे. खणखणीत आवाजामुळे गिऱ्हाईकं आपोआपच खेचली जायची त्यांच्याकडे.
बरं.. हे एवढंच नाही. एखाद्या भाभीला दुसरी एखादी वस्तू हवी असली तरी ते आणून द्यायचे..
" म्हादू भाय.. तुम पिछली बार जो कढाई लाये थे. बिल्कुल वैसी कढाई फिरसे चाहीये. ले के आना " असे म्हणत एखादी भाभी त्यांच्या हातात पैसे कोंबायची. मामा ती वस्तू घेऊन तिला घरपोचही करायचे. राहीलेले पैसे ती भाभी परत घ्यायची नाहीच, शिवाय वरुन त्यांना चहा पाजायची....
चहा ही मामांची सर्वात मोठी कमजोरी होती. दिवसातून कमीत कमी पंधरा वीस चहा तरी आरामात पीत होते ते. आमच्या दुकानातच दोन तीन चहा व्हायच्या त्यांच्या. चहा सुद्धा एकदम गरमागरमच हवी असायची त्याबाबतीत अजिबात लाड नाही. चहावाल्याला परत चहा घेऊन जायला सांगायचे जर चहा जरा जरी थंड असला तरी.
महादेव मामा हे लहानपणी अत्यंत व्रात्य म्हणता येईल असा मुलगा.. पक्का अवली. गावी असताना ते लहान असताना त्यांच्या आवडत्या बैलाला वाघाने मारले होते. पुढे त्या वाघाला शिकाऱ्यांनी मारलं तेव्हा त्या वाघावर नाचलेल्या महादेवला " वाघमाऱ्या महादेव " हेच नाव चिकटले.
तसे ते आमचे दुरचे नातेवाईक. आईचा मावसभाऊ, त्यामुळे मामा..
पण वडीलांच्या सोबतच जास्त म्हणून त्यांना मानणारे. खोड्या करायला दोघेही सोबत असायचे. वडिलांचे आणि त्यांचे नाते तेव्हा जास्तच फुलले जेव्हा मामांनी दारु सोडली. संपुर्ण तारुण्य दारुमध्ये घालवल्यानंतर वयाच्या एका टप्प्यावर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि मग ते हा धंदा करु लागलेले.
आमच्या आईला मात्र ते खूप मानायचे. आईसुद्धा त्यांना खुप मानायची. सुप, चाळणी, पाट, डब्बे एवढंच काय तर चांदिचे दागिने, पैंजण, जोडवी सुद्धा त्यांनाच आणायला सांगायची.
बाबा कधी बोलले तर..
" तुम्हाला जमणार आहे का दादासारख्या वस्तू आणायला?"
या प्रश्नावर सर्वच गप्प व्हायचे.
खरंच हा माणूस कुठून कुठून जाऊन एक एक वस्तू आणायचा हे त्यांनाच माहीत.
" ताई.. हा घे तुझा इस्टील चा डबा. " म्हणत त्यांच्या पिशवीतून आईला हवा तसाच डबा नेमका बाहेर निघत असे.
गावी गेले की मात्र राजासारखे राहत. गावी मामी आणि एक मुलगा आणि तीन मुली असं कुटूंब.
मामीच्या हातचे घावणे आजही आठवतात. मुलगा आमच्या बरोबरचाच. आमच्याच दुकानात होता. नंतर सोडून गेला, पण त्यामुळे मामा काही लांब गेले नाही.. ते आमच्यासोबतच राहीले.
दुपारी दोन वाजता दुकानात येऊन भंगारची पिशवी आणि जुन्या मालातले काही पॅकेट ते घेऊन जात. आदल्या दिवशी विकल्या गेलेल्या मालाचे पैसे न चुकता बाबांकडे देत असत. माणूस व्यवहाराला एकदम चोख. कुठेही फसवाफसवी नाही.
मोठ्या भावाच्या लग्नात सगळी खरेदी यांच्याच भरवशावर, बाशिंग, मुंडावळ्यांपासून, साखळ्या, जोडवी, हेरवी - फेरवीची खरेदी, शिवाय वऱ्हाड्यांच्या खांद्यावर टाकायला टॉवेल, नॅपकीन कुठे चांगले मिळतात ते यांच्याशिवाय कोण सांगणार?
भांजेसाब साठी त्याच्या पसंतीची लग्नाची पेटी आणायला नवरा सुद्धा हवा. " वस्तू त्याला वापरायचीय तर तो सुध्दा हवाच ना? " असं ठणकावून सांगणारे महादेव मामा.
माझ्या लग्नात सुद्धा सगळ्यात जास्त धावपळ करणारे तेच होते. लग्नाच्या दिवशीच त्यांच्या घरातल्या एकाचे लग्न होते म्हणून हळदीच्या रात्री पर्यंत थांबून ती कमी भरुन काढणारे मामाच होते.
आमच्या घरातल्या मोठ्या मुलीचे कान याच मामांनी टोचले होते. त्यातही ते एक्सपर्ट होते.
रस्त्यावरसुद्धा त्यांच्या धंद्यावर असताना अनेकजणींनी त्यांच्याकडून कान टोचून घेतले होते. बांगड्या चढवण्याचे कठीण काम सुद्धा अगदी सहज करत.
त्यांचा एक डायलॉग फार प्रसिद्ध होता. अनेकदा इतरांनी केलेल्या चुकांमुळे यांना त्रास सहन करायला लागायचा.. मग चिडून ते बोलायचे " करुन गेला गाव, आनी म्हांदेव चा नाव.. "
त्यांच्या जास्त गोड आणि चहाच्या सवयीने त्यांना मधुमेह लवकरच झालेला. अशातच देवाच्या विषयावरुन गावाचे दोन वैचारिक भाग पडले. इतकी वर्ष आम्हाला साथ देणाऱ्या मामांनी घरच्यांच्या दबावाखाली दुसऱ्या बाजूला जायचा निर्णय घेतला. त्यांची अगतिकता आम्हाला कळत होती. आम्हाला तुम्ही आमच्या घरी येऊ नका असे सांगताना त्यांच्या डोळ्यातले न दिसणारे परंतू काठोकाठ भरलेले अश्रू आम्हाला दिसायचे. आमच्याकडे येणे बंद झाल्यापासून धंदा आपोआपच बंद झाला. मुलाच्या कमाईवर जगण्यासाठी गावी जाऊन राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सोबत मग पुन्हा दारु जवळ केली. रिकाम्या माणसाचे हाल कुत्राही खात नाही. हा माणूस कधीही घरी बसून नव्हता. घरी बसला आणि हा माणूस ढासळत गेला.
अशातच एका जखमेने आणि पत्थ्य न पाळता भयंकर पसरलेल्या मधूमेहाने ते अचानक भरपूर आजारी पडले.
शेवटी शेवटी ते बाबांना बोलले की
" शेठ... मी तुमची साथ सोडून फार मोठी चुक केली."
परंतू खुप उशीर झाला होता.
अशाच एका दिवशी गावावरुन काकांचा फोन आला..
" म्हादेव दा गेले. "
आई तर धाय मोकलून रडली. गावाचे दोन भाग असल्याने आणि अंतरही लांब असल्याने जायला मिळाले नाहीच. त्या कुटूंबासोबत असलेला दुवा निखळल्यावर पुन्हा तिकडे जाण्यात काही अर्थही नव्हता.
महादेव मामा तर गेले.. पण त्यांच्या असंख्य आठवणी आजही ताज्या आहेत. सख्खा मामा नसलेला मी.. पण सख्ख्याने दिले नसते तितके प्रेम या मामाने मला.. आम्हाला दिले.
मामा आमच्या बरोबर असतात.. तर आजही सोबत असतात
पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीतले नारायण हे पात्र जरी काल्पनिक असले तरी तसे पात्र आपल्याला अनेक ठिकाणी दिसतेच दिसते. आमच्या घरी ते पात्र " महादेव मामा" म्हणून होते.
महादेव मामांना मी मला समजू लागल्या पासून बघितल्याचे आठवतंय. अवतार सुद्धा अनेक वर्ष तसाच..
काखेला भली मोठी पिशवी, दोन माप मोठा शर्ट, आठवडाभर एकच पँट, मानेभोवती लाल किंवा निळा रुमाल, केसात दात कोरायला अगरबत्तीची काडी, तोंडात संपुर्ण वेळ पान, एका हातात पाण्याची जुनी बाटली, खांद्यावर नॅपकीन, पायात स्लीपर. आम्हाला महादेव मामांना अशीच बघायची सवय होती.
आमचा व्यवसाय कानातले बनवायचा आहे, महादेव मामा त्यातलेच काही नेऊन रस्त्यावर नेऊन विकायचे. नेहमीच नविन नेतील असेही काही नाही तुटले बिटलेले सुद्धा त्यांना चालत. इकडून तिकडून जोडून जोडी बनली की ती विकायला मोकळी.
महादेव मामांचा एक एरिया होता ते तिकडेच जास्त बसत. आमचं दुकान भुलेश्वरला, पण तिथे जास्त गर्दी शिवाय पोलिसांचा सारखा त्रास म्हणून ते थोडावेळ भास्कर लेन, थोडावेळ रामवाडी तर थोडा वेळ पार तिकडे चिराबाजारच्या कोलभाट लेनमध्ये. जिथे जातील तिथे त्यांच्या ओळखी ठरलेल्या. माणूस इतका बडबड्या की दुर्लक्षीत राहूच शकत नाही. त्यांच्या बडबडीचा त्रास झालेली व्यक्ती मला तरी आठवत नाही. सतत कोणतेतरी किस्से आणि गोष्टी सांगून समोरच्या गिऱ्हाईकाला कसं पटवायचं हे मामांनाच जमावं...
यांची गिऱ्हाईक म्हणजे तरी कोण. अगदी जीना झाडणाऱ्या मुली पासून त्याच बिल्डींग मध्ये मोठ्या घरात राहणारी भाभी सुद्धा. ती मुलगी जर दोन रुपये खर्च करणार असेल तर तिला त्या प्रकारची वस्तू दाखवणार आणि भाभीला महागातली. त्यांच्या त्या पिशवीतून काय बाहेर येईल हे कधीच कोणाला कळायचे नाही.
मी एकदा त्यांना दुकान लावताना पाहीलेलं..
सर्वात पहिले खाली पेपर अंथरुन, त्यावर प्लास्टिक चा कागद आणि मग त्यावर एक एक खोके असे रचत की समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला एका नजरेत सर्व माल दिसे. कानातले डूल, झुमक्या, गळ्यातले हार, माळा, केसांचे बक्कल, लुजर अनेक प्रकारचे टिकल्या, सुया, बांगड्या सर्व वस्तू मिळत त्यांच्याकडे. सर्व दुकान लावून झाले की... " बोलण्याची मातीपण विकली जाते... " नुसार... आओ आओ, लॉट है..सेल है..., पाच पाच रुपया असे ओरडणे सुरु व्हायचे. खणखणीत आवाजामुळे गिऱ्हाईकं आपोआपच खेचली जायची त्यांच्याकडे.
बरं.. हे एवढंच नाही. एखाद्या भाभीला दुसरी एखादी वस्तू हवी असली तरी ते आणून द्यायचे..
" म्हादू भाय.. तुम पिछली बार जो कढाई लाये थे. बिल्कुल वैसी कढाई फिरसे चाहीये. ले के आना " असे म्हणत एखादी भाभी त्यांच्या हातात पैसे कोंबायची. मामा ती वस्तू घेऊन तिला घरपोचही करायचे. राहीलेले पैसे ती भाभी परत घ्यायची नाहीच, शिवाय वरुन त्यांना चहा पाजायची....
चहा ही मामांची सर्वात मोठी कमजोरी होती. दिवसातून कमीत कमी पंधरा वीस चहा तरी आरामात पीत होते ते. आमच्या दुकानातच दोन तीन चहा व्हायच्या त्यांच्या. चहा सुद्धा एकदम गरमागरमच हवी असायची त्याबाबतीत अजिबात लाड नाही. चहावाल्याला परत चहा घेऊन जायला सांगायचे जर चहा जरा जरी थंड असला तरी.
महादेव मामा हे लहानपणी अत्यंत व्रात्य म्हणता येईल असा मुलगा.. पक्का अवली. गावी असताना ते लहान असताना त्यांच्या आवडत्या बैलाला वाघाने मारले होते. पुढे त्या वाघाला शिकाऱ्यांनी मारलं तेव्हा त्या वाघावर नाचलेल्या महादेवला " वाघमाऱ्या महादेव " हेच नाव चिकटले.
तसे ते आमचे दुरचे नातेवाईक. आईचा मावसभाऊ, त्यामुळे मामा..
पण वडीलांच्या सोबतच जास्त म्हणून त्यांना मानणारे. खोड्या करायला दोघेही सोबत असायचे. वडिलांचे आणि त्यांचे नाते तेव्हा जास्तच फुलले जेव्हा मामांनी दारु सोडली. संपुर्ण तारुण्य दारुमध्ये घालवल्यानंतर वयाच्या एका टप्प्यावर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि मग ते हा धंदा करु लागलेले.
आमच्या आईला मात्र ते खूप मानायचे. आईसुद्धा त्यांना खुप मानायची. सुप, चाळणी, पाट, डब्बे एवढंच काय तर चांदिचे दागिने, पैंजण, जोडवी सुद्धा त्यांनाच आणायला सांगायची.
बाबा कधी बोलले तर..
" तुम्हाला जमणार आहे का दादासारख्या वस्तू आणायला?"
या प्रश्नावर सर्वच गप्प व्हायचे.
खरंच हा माणूस कुठून कुठून जाऊन एक एक वस्तू आणायचा हे त्यांनाच माहीत.
" ताई.. हा घे तुझा इस्टील चा डबा. " म्हणत त्यांच्या पिशवीतून आईला हवा तसाच डबा नेमका बाहेर निघत असे.
गावी गेले की मात्र राजासारखे राहत. गावी मामी आणि एक मुलगा आणि तीन मुली असं कुटूंब.
मामीच्या हातचे घावणे आजही आठवतात. मुलगा आमच्या बरोबरचाच. आमच्याच दुकानात होता. नंतर सोडून गेला, पण त्यामुळे मामा काही लांब गेले नाही.. ते आमच्यासोबतच राहीले.
दुपारी दोन वाजता दुकानात येऊन भंगारची पिशवी आणि जुन्या मालातले काही पॅकेट ते घेऊन जात. आदल्या दिवशी विकल्या गेलेल्या मालाचे पैसे न चुकता बाबांकडे देत असत. माणूस व्यवहाराला एकदम चोख. कुठेही फसवाफसवी नाही.
मोठ्या भावाच्या लग्नात सगळी खरेदी यांच्याच भरवशावर, बाशिंग, मुंडावळ्यांपासून, साखळ्या, जोडवी, हेरवी - फेरवीची खरेदी, शिवाय वऱ्हाड्यांच्या खांद्यावर टाकायला टॉवेल, नॅपकीन कुठे चांगले मिळतात ते यांच्याशिवाय कोण सांगणार?
भांजेसाब साठी त्याच्या पसंतीची लग्नाची पेटी आणायला नवरा सुद्धा हवा. " वस्तू त्याला वापरायचीय तर तो सुध्दा हवाच ना? " असं ठणकावून सांगणारे महादेव मामा.
माझ्या लग्नात सुद्धा सगळ्यात जास्त धावपळ करणारे तेच होते. लग्नाच्या दिवशीच त्यांच्या घरातल्या एकाचे लग्न होते म्हणून हळदीच्या रात्री पर्यंत थांबून ती कमी भरुन काढणारे मामाच होते.
आमच्या घरातल्या मोठ्या मुलीचे कान याच मामांनी टोचले होते. त्यातही ते एक्सपर्ट होते.
रस्त्यावरसुद्धा त्यांच्या धंद्यावर असताना अनेकजणींनी त्यांच्याकडून कान टोचून घेतले होते. बांगड्या चढवण्याचे कठीण काम सुद्धा अगदी सहज करत.
त्यांचा एक डायलॉग फार प्रसिद्ध होता. अनेकदा इतरांनी केलेल्या चुकांमुळे यांना त्रास सहन करायला लागायचा.. मग चिडून ते बोलायचे " करुन गेला गाव, आनी म्हांदेव चा नाव.. "
त्यांच्या जास्त गोड आणि चहाच्या सवयीने त्यांना मधुमेह लवकरच झालेला. अशातच देवाच्या विषयावरुन गावाचे दोन वैचारिक भाग पडले. इतकी वर्ष आम्हाला साथ देणाऱ्या मामांनी घरच्यांच्या दबावाखाली दुसऱ्या बाजूला जायचा निर्णय घेतला. त्यांची अगतिकता आम्हाला कळत होती. आम्हाला तुम्ही आमच्या घरी येऊ नका असे सांगताना त्यांच्या डोळ्यातले न दिसणारे परंतू काठोकाठ भरलेले अश्रू आम्हाला दिसायचे. आमच्याकडे येणे बंद झाल्यापासून धंदा आपोआपच बंद झाला. मुलाच्या कमाईवर जगण्यासाठी गावी जाऊन राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सोबत मग पुन्हा दारु जवळ केली. रिकाम्या माणसाचे हाल कुत्राही खात नाही. हा माणूस कधीही घरी बसून नव्हता. घरी बसला आणि हा माणूस ढासळत गेला.
अशातच एका जखमेने आणि पत्थ्य न पाळता भयंकर पसरलेल्या मधूमेहाने ते अचानक भरपूर आजारी पडले.
शेवटी शेवटी ते बाबांना बोलले की
" शेठ... मी तुमची साथ सोडून फार मोठी चुक केली."
परंतू खुप उशीर झाला होता.
अशाच एका दिवशी गावावरुन काकांचा फोन आला..
" म्हादेव दा गेले. "
आई तर धाय मोकलून रडली. गावाचे दोन भाग असल्याने आणि अंतरही लांब असल्याने जायला मिळाले नाहीच. त्या कुटूंबासोबत असलेला दुवा निखळल्यावर पुन्हा तिकडे जाण्यात काही अर्थही नव्हता.
महादेव मामा तर गेले.. पण त्यांच्या असंख्य आठवणी आजही ताज्या आहेत. सख्खा मामा नसलेला मी.. पण सख्ख्याने दिले नसते तितके प्रेम या मामाने मला.. आम्हाला दिले.
मामा आमच्या बरोबर असतात.. तर आजही सोबत असतात
No comments:
Post a Comment