त्रिशंकू
आज त्याला जाऊन तीन वर्ष झाली. पाच वर्षांचा संसार.. सुखाचा आणि समाधानाचा, संसार वेलीला लागलेलं एक फुल.. एकत्र कुटूंब दिर भावजय त्यांचा मुलगा, सासू सासरे कशाची कमी नाही...
आणि अचानक त्याचे असे निघून जाणे..
अनिकेत.. तू मला हवा होतास रे... पण आता काय उपयोग.. तू काही परत येऊ शकणार नाहीस.
मला आधार हवा होता रे... अनिकेत तू मला सोडून गेलास पण अनिल ने मला आधार दिला..
काय हरकत आहे? घरातले सगळे म्हणत होते की लग्न कर.. पण तो पुन्हा नविन डाव... संसार पुन्हा सुरु करणे सोप्पं नव्हते रे.. त्यात अक्षर ची जबाबदारी घ्यायला तयार तरी कोण होणार.
मी खुप विचार केला रे अनिकेत.. शरीराचीही गरज असते रे..
मला अनिलने जेव्हा पहिल्यांदा विचारले तेव्हा खरंच वाटेना...
असं कसं विचारु शकतो तो?
अरे तू अनिकेत चा सख्खा भाऊ ना?
पण मग विचार केला..
काय हरकत आहे. घरातच तर राहणार. अक्षरच्या पालनपोषणाचाही प्रश्न सुटेल. माझी नोकरी आहेच पण अनिलचा प्रस्ताव स्विकारला तर त्याचे आणि माझे भविष्यही सुरक्षित होईल. लोक काय म्हणतील हा प्रश्न गौण झाला मग माझ्यासाठी. हेच लोक माझ्या रिकाम्या गळ्याकडे पाहून चुकचूकत होती. संधी शोधत होते.. खोटी सहानुभूती दाखवत होते. आम्हा बायकांना सहावे इंद्रिय असते ना... लोकांच्या नजरा ओळखल्या रे मी.. सर्वांना मी हवी होती... फक्त मी.
मग अनिल च्या प्रस्तावाचा विचार केला. जे काही असेल ते इथेच.
सुख आणि सुरक्षित भविष्य..
अक्षर सुद्धा समजून घेईल हळू हळू.. बाबांच्या ठिकाणी काका..
अनघा काय बोलेल, अद्वैत काय बोलेल हे प्रश्न आले रे मनात.. पण शरीराच्या गरजेपुढे ते सर्व गौण ठरले. मी नाही रे आवरु शकले स्वतःला..
अनिल ने कबूल केलं मला आज आम्ही जातोय.. हे घर सोडून. तूला सुद्धा इथेच ठेवून...
तू माझा भूतकाळ होतास.. अनिल भविष्य आहे.. लग्न केलं तर लग्न.. नाही तर तसंच.. फक्त तूझे नाव घेऊन जातेय मी...
चंदनाचा हार घातलेल्या अनिकेतच्या फोटोला अक्षर ला नमस्कार करायला सांगून.. अर्चनाने बॅग भरायला सुरुवात केली...
...................................
तिची घुसमट मला समजत होती. सठ्ठावीसाव्या वर्षी वैधव्य येणे ही फार वाईट गोष्ट होती. अर्चना सुंदर आहे... यात काही संशय नाही. अनघा आणि माझा प्रेमविवाह, पण अनिकेतच्या अचानक जाण्याने आमच्या कुटूंबात भरपूर उलथा पालथ झाली. मी अनिकेतच्या सरणावर कबूल केलं की अर्चना आणि अक्षरला कधीही अंतर देणार नाही....
तेव्हा अजिबात वाटलं नाही की परिस्थिती अशी येईल.
एका क्षणी तिच्याबद्दल जी भावना उचंबळून आली ती मी रोखू शकलो नाही हीच माझी चुक. अक्षरची जबाबदारी मी घ्यायला तयार होतो, पण अर्चनाची संपूर्ण जबाबदारी कशी आणि कोणत्या नात्याने घेणार. लोक काय.. बोलणारे बोलतील. मला त्यांची चिंता कधीच नव्हती.
पण ज्या क्षणी अनघाने आम्हाला एकत्र पाहीलं तो क्षण नसता आला तरच बरे झाले असते. मी पर्याय ठेवला अनघा समोर पण तो तिने धुडकावला. अर्चनाला शरीरसुख हवे होते त्याचबरोबर मानसिक स्थैर्य आणि आधाराची गरज होती. इतर कोणात शोधला असता तर कुटूंबावर डाग लागला असता किंवा फसवणूक तरी झाली असती.
माझ्यामते मी दिलेला पर्याय अजिबात चुकीचा नव्हता. घरातली गोष्ट घरातच राहीली असती.
अनघाचा त्रागा समजण्यासारखा होता.. पण त्याला काही अर्थ नव्हता. तिने जरा विचार केला असता तर... हे जे होतंय ते झाले नसते. अद्वैत ला समजावणे जरा कठीणच होणार आहे. "बाबा काकीसोबत का गेले " या प्रश्नाचे उत्तर अनघालाच द्यायचे होते. अद्वैत काय आणि अक्षर काय दोन्ही आमच्या घराचे वारस...
जबाबदारी अजिबात नाकारत नाही मी..
ना अनघाची... ना अद्वैतची... मी फक्त साथ देतोय.. अर्चनाला... अक्षरला..
अनिकेत मी तुझा विश्वासघात नाही केलाय.. तू अर्धवट टाकलेली जबाबदारी उचलतोय..
खिडकीकडे तोंड करुन बसलेल्या अनघा कडे आणि रडत असलेल्या अद्वैत कडे एकवार बघून अनिल बॅग घ्यायला खाली वाकला.
...............................
काय होती माझी चुक??
सांग ना रे.. मला हे असे आयुष्य देऊन कसा सुखी राहशील तू.. अनिल?
तुझ्यावर विश्वास टाकून, घरातल्या लोकांचा विरोध पत्करुन मी तुझ्यासोबत लग्न करुन या घरात आले. अर्चना अनिकेतची होती.. माझ्यानंतर आली.. मी नसेन तिच्या इतकी सुंदर. पण ती तुझ्या दिवंगत भावाची बायको आहे हे सुद्धा विसरलास..
आणि मी कुठे कमी पडले रे तुला? सौंदर्य ही सहवासाची परिभाषा कधीही नव्हती तूझी. आपण दहा वर्ष एकत्र काढली रे.. कधीतरी मी नाही म्हटले का तुला.. भावना दाबल्या जातात.. इच्छा असली की सर्व शक्य होते रे.. निदान अद्वैतचा तरी विचार करायचा. त्याने तुम्हा दोघांना एकत्र बघीतल्यापासून त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता देता मी हरलेय रे...
आणि माझे तरी काय चुकले?
माझ्या समोर तुम्ही माझ्याच संसारावर वरवंटा फिरवणार?
घरातली मोठी सून म्हणून मला जे हक्क आहेत ते मी कधीही सोडणार नाही. आणि सोडावे तरी का? तू माझ्याशी प्रतारणा केलीस.. मी नाही.. मी सांभाळेन अद्वैतला, तेवढी मी नक्कीच सशक्त आहे.. तुझे बाबा माझ्यासोबत आहेत..
तू म्हणतोस एकत्र राहू.. दुहेरी संसार करु.. तिची जबाबदारी घ्यायला माझी ना नव्हतीच.. पण शारीरिक सुखासाठी जे तुमचं चाललंय ते मला कधीही मान्य नाही.
जा तुम्ही.. माझ्या नजरेसमोरच नको तुम्ही आणि तूमचे वासनेवर बेतलेले नाते.. निभावायला तूम्ही दुसरे घर बघा.
रडणाऱ्या अद्वैतचा हात अजून घट्ट पकडून.. खिडकीबाहेर बघत, अनघा दूर दूर जाणाऱ्या पदरवांना ऐकत राहीली.
- बिझ सं जय ( ३० नोव्हेंबर, २०१६)
आज त्याला जाऊन तीन वर्ष झाली. पाच वर्षांचा संसार.. सुखाचा आणि समाधानाचा, संसार वेलीला लागलेलं एक फुल.. एकत्र कुटूंब दिर भावजय त्यांचा मुलगा, सासू सासरे कशाची कमी नाही...
आणि अचानक त्याचे असे निघून जाणे..
अनिकेत.. तू मला हवा होतास रे... पण आता काय उपयोग.. तू काही परत येऊ शकणार नाहीस.
मला आधार हवा होता रे... अनिकेत तू मला सोडून गेलास पण अनिल ने मला आधार दिला..
काय हरकत आहे? घरातले सगळे म्हणत होते की लग्न कर.. पण तो पुन्हा नविन डाव... संसार पुन्हा सुरु करणे सोप्पं नव्हते रे.. त्यात अक्षर ची जबाबदारी घ्यायला तयार तरी कोण होणार.
मी खुप विचार केला रे अनिकेत.. शरीराचीही गरज असते रे..
मला अनिलने जेव्हा पहिल्यांदा विचारले तेव्हा खरंच वाटेना...
असं कसं विचारु शकतो तो?
अरे तू अनिकेत चा सख्खा भाऊ ना?
पण मग विचार केला..
काय हरकत आहे. घरातच तर राहणार. अक्षरच्या पालनपोषणाचाही प्रश्न सुटेल. माझी नोकरी आहेच पण अनिलचा प्रस्ताव स्विकारला तर त्याचे आणि माझे भविष्यही सुरक्षित होईल. लोक काय म्हणतील हा प्रश्न गौण झाला मग माझ्यासाठी. हेच लोक माझ्या रिकाम्या गळ्याकडे पाहून चुकचूकत होती. संधी शोधत होते.. खोटी सहानुभूती दाखवत होते. आम्हा बायकांना सहावे इंद्रिय असते ना... लोकांच्या नजरा ओळखल्या रे मी.. सर्वांना मी हवी होती... फक्त मी.
मग अनिल च्या प्रस्तावाचा विचार केला. जे काही असेल ते इथेच.
सुख आणि सुरक्षित भविष्य..
अक्षर सुद्धा समजून घेईल हळू हळू.. बाबांच्या ठिकाणी काका..
अनघा काय बोलेल, अद्वैत काय बोलेल हे प्रश्न आले रे मनात.. पण शरीराच्या गरजेपुढे ते सर्व गौण ठरले. मी नाही रे आवरु शकले स्वतःला..
अनिल ने कबूल केलं मला आज आम्ही जातोय.. हे घर सोडून. तूला सुद्धा इथेच ठेवून...
तू माझा भूतकाळ होतास.. अनिल भविष्य आहे.. लग्न केलं तर लग्न.. नाही तर तसंच.. फक्त तूझे नाव घेऊन जातेय मी...
चंदनाचा हार घातलेल्या अनिकेतच्या फोटोला अक्षर ला नमस्कार करायला सांगून.. अर्चनाने बॅग भरायला सुरुवात केली...
...................................
तिची घुसमट मला समजत होती. सठ्ठावीसाव्या वर्षी वैधव्य येणे ही फार वाईट गोष्ट होती. अर्चना सुंदर आहे... यात काही संशय नाही. अनघा आणि माझा प्रेमविवाह, पण अनिकेतच्या अचानक जाण्याने आमच्या कुटूंबात भरपूर उलथा पालथ झाली. मी अनिकेतच्या सरणावर कबूल केलं की अर्चना आणि अक्षरला कधीही अंतर देणार नाही....
तेव्हा अजिबात वाटलं नाही की परिस्थिती अशी येईल.
एका क्षणी तिच्याबद्दल जी भावना उचंबळून आली ती मी रोखू शकलो नाही हीच माझी चुक. अक्षरची जबाबदारी मी घ्यायला तयार होतो, पण अर्चनाची संपूर्ण जबाबदारी कशी आणि कोणत्या नात्याने घेणार. लोक काय.. बोलणारे बोलतील. मला त्यांची चिंता कधीच नव्हती.
पण ज्या क्षणी अनघाने आम्हाला एकत्र पाहीलं तो क्षण नसता आला तरच बरे झाले असते. मी पर्याय ठेवला अनघा समोर पण तो तिने धुडकावला. अर्चनाला शरीरसुख हवे होते त्याचबरोबर मानसिक स्थैर्य आणि आधाराची गरज होती. इतर कोणात शोधला असता तर कुटूंबावर डाग लागला असता किंवा फसवणूक तरी झाली असती.
माझ्यामते मी दिलेला पर्याय अजिबात चुकीचा नव्हता. घरातली गोष्ट घरातच राहीली असती.
अनघाचा त्रागा समजण्यासारखा होता.. पण त्याला काही अर्थ नव्हता. तिने जरा विचार केला असता तर... हे जे होतंय ते झाले नसते. अद्वैत ला समजावणे जरा कठीणच होणार आहे. "बाबा काकीसोबत का गेले " या प्रश्नाचे उत्तर अनघालाच द्यायचे होते. अद्वैत काय आणि अक्षर काय दोन्ही आमच्या घराचे वारस...
जबाबदारी अजिबात नाकारत नाही मी..
ना अनघाची... ना अद्वैतची... मी फक्त साथ देतोय.. अर्चनाला... अक्षरला..
अनिकेत मी तुझा विश्वासघात नाही केलाय.. तू अर्धवट टाकलेली जबाबदारी उचलतोय..
खिडकीकडे तोंड करुन बसलेल्या अनघा कडे आणि रडत असलेल्या अद्वैत कडे एकवार बघून अनिल बॅग घ्यायला खाली वाकला.
...............................
काय होती माझी चुक??
सांग ना रे.. मला हे असे आयुष्य देऊन कसा सुखी राहशील तू.. अनिल?
तुझ्यावर विश्वास टाकून, घरातल्या लोकांचा विरोध पत्करुन मी तुझ्यासोबत लग्न करुन या घरात आले. अर्चना अनिकेतची होती.. माझ्यानंतर आली.. मी नसेन तिच्या इतकी सुंदर. पण ती तुझ्या दिवंगत भावाची बायको आहे हे सुद्धा विसरलास..
आणि मी कुठे कमी पडले रे तुला? सौंदर्य ही सहवासाची परिभाषा कधीही नव्हती तूझी. आपण दहा वर्ष एकत्र काढली रे.. कधीतरी मी नाही म्हटले का तुला.. भावना दाबल्या जातात.. इच्छा असली की सर्व शक्य होते रे.. निदान अद्वैतचा तरी विचार करायचा. त्याने तुम्हा दोघांना एकत्र बघीतल्यापासून त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता देता मी हरलेय रे...
आणि माझे तरी काय चुकले?
माझ्या समोर तुम्ही माझ्याच संसारावर वरवंटा फिरवणार?
घरातली मोठी सून म्हणून मला जे हक्क आहेत ते मी कधीही सोडणार नाही. आणि सोडावे तरी का? तू माझ्याशी प्रतारणा केलीस.. मी नाही.. मी सांभाळेन अद्वैतला, तेवढी मी नक्कीच सशक्त आहे.. तुझे बाबा माझ्यासोबत आहेत..
तू म्हणतोस एकत्र राहू.. दुहेरी संसार करु.. तिची जबाबदारी घ्यायला माझी ना नव्हतीच.. पण शारीरिक सुखासाठी जे तुमचं चाललंय ते मला कधीही मान्य नाही.
जा तुम्ही.. माझ्या नजरेसमोरच नको तुम्ही आणि तूमचे वासनेवर बेतलेले नाते.. निभावायला तूम्ही दुसरे घर बघा.
रडणाऱ्या अद्वैतचा हात अजून घट्ट पकडून.. खिडकीबाहेर बघत, अनघा दूर दूर जाणाऱ्या पदरवांना ऐकत राहीली.
- बिझ सं जय ( ३० नोव्हेंबर, २०१६)